शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो : बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:11 IST

आजरा : फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आजच्या अंधारमय काळात प्रकाशाची ज्योत पेटत आहे.

ठळक मुद्देबेळगाव येथे राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार प्रदानपैशाला हात लावायला सरकारला कोणी रोखलं आहे काय?

आजरा : फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आजच्या अंधारमय काळात प्रकाशाची ज्योत पेटत आहे. त्यामुळे पुरोगाम्यांनी खचून न जाता नव्या पिढीमध्ये विचारांची पेरणी केल्यास पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केला.

बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयात बाबा आढाव यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते कॉ. कृष्णा मेणसे यांच्या हस्ते राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आढाव म्हणाले, समाजातील मोठा वर्ग आजही अंधश्रद्धेत हरवला आहे. अंधश्रद्धा दूर करायची असेल तर विज्ञानवादी संस्कारक्षम पिढी निर्माण होण्याची गरज आहे. जोपर्यंत तरुण पिढीशी संवाद होत नाही. तोपर्यंत विचारांचा आबोला राहणार आहे. सत्यशोधक चळवळ अनेकांनी पुढे नेली ती आताच का थबकली याचा विचार करण्याची गरज आहे.

नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे कष्टकरांची उपासमार झाली. आज देशातील ५० कोटी जनता असुरक्षित, अस्वस्थ आणि असंघटित आहे. असे असताना देशातील मंदिरातील सोने, पैशाला हात लावायला सरकारला कोणी रोखलं आहे काय? असा सवाल करून हमीभावाचा मूळ प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत आत्महत्या होणारच असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, राष्ट्रवीरकार देसाई यांनी निर्भिड पत्रकारिता केली. राष्ट्रवीरकारांनी अज्ञान, अंधश्रद्धेवर, धार्मिक गुलामगिरीविरुद्ध लेखणी व कृतीतून घणाघात केला. त्यांचे अप्रकाशित असलेले लेख ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित करणार आहेत. यावेळी प्राचार्य आनंद मेणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, प्रकाश मरगाळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर, शिवाजी देसाई, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, कॉ. संपत देसाई, प्रा. डॉ. प्रकाश पवार, एम. डी. कांबळे यांसह बेळगाव, आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. राजाभाऊ पाटील यांनी स्वागत केले. प्रा. मायाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विक्रम पाटील यांनी आभार मानले.बेळगावात लक्ष्मी यात्रा बंदसत्यशोधक चळवळ मोठ्या प्रमाणात रुजविलेल्या बेळगावमध्ये १९३६ पासून लक्ष्मी यात्रा होत नाही. यात्रा, मंदिरापेक्षा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे, असेही मेणसे यांनी यावेळी सांगितले.‘शाहू महाराजांची माया वेगळी’

आढाव यांनी शाहू महाराजांच्या निधनानंतर महाराजांसोबत असणाºया वृद्ध धनगराला आपण भेटल्याचे सांगितले. त्यावेळी धनगराला राजा गेल्यामुळे आता तुम्हीच राजे झाला असा मिश्किलपणे सवाल केला. त्यावर तो धनगर म्हणाला, ‘आम्ही राजे झालो खरं, पण शाहू राजांची माया आगळीच होती’, असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.